महाबळेश्वरच्या अक्षर मानव संमेलनानंतर सोलापुरात आल्यावर हयात पठाण, भरत यादवच्या पुढाकारने आम्ही चौघांनी प्रत्येकी काही रक्कम घालत हत्तरसंग कुडलला सोलापुरातील दहा कॉलेजांमधील साठ तरुण मुलामुलींचे संमेलन घेतले. ते सुद्धा खुल्या चर्चेचे. तिथेही झालेली आरक्षणावर चर्चा तरुणांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषावर प्रकाश टाकत गेली. आरक्षण कशासाठी याची समाजात खोलवर जाणीव करुन देण्यात आपली व्यवस्था समाजकारण करणारी मंडळी किती तोकडी पडतात, याचे दर्शन झाले. या संमेलनात कॉम्रेड तानाजी ठोंबरे, दत्ता गायकवाड, चित्रकार धोत्रे यांची भाषणे खूप चांगली झाली होती. दत्ता गायकवाड यांनी आरक्षणासंबंधी मांडलेली भूमिका अनेकांना नव्यानेच दृष्टी देऊन जाणारी होती. ते म्हणाले, "आरक्षण कुणाला मिळते. ते फक्त शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मिळते, असा आपला समज आहे. पण तसे नाही. सहकारी साखर कारखाने उभारणारे साखर सम्राट, शैक्षणिक संस्था काढून सरकारी फायदे लाटणारे शिक्षणसम्राट यांना ज्या मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जातात, त्यांना आपण आरक्षण म्हणणार नाही का? आरक्षण पहिले कुणी दिले. मनु नावाच्या ऋषीने. समाजातील प्रबळांना शंभर टक्के. शेती आणि संपत्तीत. आरक्षण हा काही दारिद्रय निमुर्लनाचा कार्यक्रम नाही. हजारो वर्ष पिचलेल्या पिचलेल्या वर्गाला सगळ्यांच्याबरोबर आणण्यासाठीचा तो सामाजिक विषय आहे. नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण घेणारी आणि आरक्षण न घेणारी मुले ज्यावेळी समान पातळीवर येतील, तेव्हा आरक्षण आपोआप संपेल. आपण गोष्टी खोलवर समजून घेतल्या पाहिजे.'
सगळ्या मुली-मुलांना बोलते केल्यानंतर तिथून निघताना आपण नवे काहीतरी शिकलोय, या जाणिवेबरोबरच मुलांना व्यक्त होऊ दिल्यानंतर त्यांचे फुलून जाणे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू असे म्हणणे हे सगळे तसे आनंददायक होते. त्याच रात्री रात्रभर राजन खान यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. रात्री साधारण आम्ही आठला सोलापुरात आलो. पुढे मी व्यक्तीगतरित्या या मुलांशी संबंध ठेवला नाही. पुढे वेळ मिळेल तशा विविध गोष्टी करत राहिलो.
पाचगणीला 2013 लाही पुन्हा जाऊन आलो. संमेलनाचा विषय माणूस होता. या संमेलनातून आपल्याला फार काही मिळाले नाही, असे वाटत राहिले. या संमेलनात खरे तर मला बोलायला मिळाले. मी मला भेटलेल्या, माझ्यावर ठसा उमटविणाऱ्या माणसांविषयी बोललो. लोकांनी दाद दिली. या संघटेकडून आपण काय मागतो तर काहीच नाही. पण तरीही तसा या संघटनेशी संपर्क राहिला नाही.
माणूस केंद्रस्थानी ठेऊन आपण जसा विचार करतो, तसा विचार समाजात रुजणे हे कितीही महत्वाचे असले तरी सगळीच माणसं तसा विचार करतात, असे नाही. कट्टरपणा सगळीकडेच आहे. कट्टरपणाला कट्टरपणा हे काही उत्तर नाही, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे जिथे माणसाच्या मनात माणसांप्रती दुजाभाव दिसतो, तिथे आपले जमत नाही. मन रमत नाही. एखादा चुकत असेल, चुकला असेल तर त्याला आईच्या ममतेने दोन रट्टे देणे वेगळे आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन शत्रू मानणे वेगळे. माणसाने माणसाचा शत्रू कधी होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या अगदी चाळीशीत मला ही गोष्ट निदान वाचेच्या पातळीवर कळाली आणि आकलनाच्या पातळीवर मांडता येऊ लागली, असे मला वाटते.
गावात आपण काहीतरी करावे, ही उमीसुद्धा एके काळी माझ्या मनात फार उफाळून आली होती. अनेक पोरांशी त्याविषयी गप्पा मारायचो. पण त्या अनुभवातून मी इतकेच शिकलो की आपण आपल्या गावात काही करण्यापेक्षा बाहेर बरेच काही करु शकतो. बाहेर काही हातपाय मारायचे प्रयत्न करायला जमले नाही. खरे तर हे सगळे अनुभव या मुलींच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या निमित्ताने मांडणे एवढेच त्याचे प्रयोजन आहे. या मुलींबरोबर आम्ही पुढे एक नोहार्ड नावाची सेवाभावी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. नोकरीत असल्या कामाला कधीच वेळ देता येत नाही. त्या संस्थेचे पुढे काय झाले, मला माहित नाही मात्र दोन तीन बैठकांनंतर मी या संस्थेच्या कामात काही लक्ष घातले नाही. आता या टप्प्यावरसुद्धा मला असे वाटते की आपण सामाजिक कामात उतरावे. काहीतरी वेगळे करता आले तर पहावे. मला आता समाजातील वृद्धांचे प्रश्न फार भीषण झाल्याचे दिसते. त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल याची मी खरेच मनोमन चाचपणी करीत आहे. काही गोष्टींचे आराखडे मनात बांधले जात आहेत. आणखीही काही मनात आहे. ते आकाराला येईल तेव्हा त्यातले अनुभव खरेपणाने शेअर करता आले तर बरे होईल. पण त्यासाठी जुने काही पाश तोडावे लागतील. ते कधी तुटणार असा मी मला प्रश्न विचारतोय?
सगळ्या मुली-मुलांना बोलते केल्यानंतर तिथून निघताना आपण नवे काहीतरी शिकलोय, या जाणिवेबरोबरच मुलांना व्यक्त होऊ दिल्यानंतर त्यांचे फुलून जाणे पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू असे म्हणणे हे सगळे तसे आनंददायक होते. त्याच रात्री रात्रभर राजन खान यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. रात्री साधारण आम्ही आठला सोलापुरात आलो. पुढे मी व्यक्तीगतरित्या या मुलांशी संबंध ठेवला नाही. पुढे वेळ मिळेल तशा विविध गोष्टी करत राहिलो.
पाचगणीला 2013 लाही पुन्हा जाऊन आलो. संमेलनाचा विषय माणूस होता. या संमेलनातून आपल्याला फार काही मिळाले नाही, असे वाटत राहिले. या संमेलनात खरे तर मला बोलायला मिळाले. मी मला भेटलेल्या, माझ्यावर ठसा उमटविणाऱ्या माणसांविषयी बोललो. लोकांनी दाद दिली. या संघटेकडून आपण काय मागतो तर काहीच नाही. पण तरीही तसा या संघटनेशी संपर्क राहिला नाही.
माणूस केंद्रस्थानी ठेऊन आपण जसा विचार करतो, तसा विचार समाजात रुजणे हे कितीही महत्वाचे असले तरी सगळीच माणसं तसा विचार करतात, असे नाही. कट्टरपणा सगळीकडेच आहे. कट्टरपणाला कट्टरपणा हे काही उत्तर नाही, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे जिथे माणसाच्या मनात माणसांप्रती दुजाभाव दिसतो, तिथे आपले जमत नाही. मन रमत नाही. एखादा चुकत असेल, चुकला असेल तर त्याला आईच्या ममतेने दोन रट्टे देणे वेगळे आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन शत्रू मानणे वेगळे. माणसाने माणसाचा शत्रू कधी होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या अगदी चाळीशीत मला ही गोष्ट निदान वाचेच्या पातळीवर कळाली आणि आकलनाच्या पातळीवर मांडता येऊ लागली, असे मला वाटते.
गावात आपण काहीतरी करावे, ही उमीसुद्धा एके काळी माझ्या मनात फार उफाळून आली होती. अनेक पोरांशी त्याविषयी गप्पा मारायचो. पण त्या अनुभवातून मी इतकेच शिकलो की आपण आपल्या गावात काही करण्यापेक्षा बाहेर बरेच काही करु शकतो. बाहेर काही हातपाय मारायचे प्रयत्न करायला जमले नाही. खरे तर हे सगळे अनुभव या मुलींच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाच्या निमित्ताने मांडणे एवढेच त्याचे प्रयोजन आहे. या मुलींबरोबर आम्ही पुढे एक नोहार्ड नावाची सेवाभावी संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर केली. नोकरीत असल्या कामाला कधीच वेळ देता येत नाही. त्या संस्थेचे पुढे काय झाले, मला माहित नाही मात्र दोन तीन बैठकांनंतर मी या संस्थेच्या कामात काही लक्ष घातले नाही. आता या टप्प्यावरसुद्धा मला असे वाटते की आपण सामाजिक कामात उतरावे. काहीतरी वेगळे करता आले तर पहावे. मला आता समाजातील वृद्धांचे प्रश्न फार भीषण झाल्याचे दिसते. त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल याची मी खरेच मनोमन चाचपणी करीत आहे. काही गोष्टींचे आराखडे मनात बांधले जात आहेत. आणखीही काही मनात आहे. ते आकाराला येईल तेव्हा त्यातले अनुभव खरेपणाने शेअर करता आले तर बरे होईल. पण त्यासाठी जुने काही पाश तोडावे लागतील. ते कधी तुटणार असा मी मला प्रश्न विचारतोय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा