सात फेब्रुवारी 2011
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर
सुवर्णमहोत्सवानिमित्त पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या होस्टेलमधील माजी
विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी पाच फेब्रुवारीला होत आहे. होस्टेलचे प्रदीर्घ काळ
रेक्टर राहिलेले प्रा. आर. व्ही. कुलकर्णी हेही आपल्या जबाबदारीतून मुक्त होत
आहेत. त्यानिमित्त या होस्टेल आणि त्यांच्या वेगळेपणाविषयी....
राजाराम ल. कानतोडे
-----------------------------
प्रेमाने जवळ न घेता अथवा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांत कटू भावना निर्माण होईल, असे न वागता अनेक शिक्षक आपल्या वागण्यातून विद्यार्थ्यांत स्फूर्ती जागवत असतात. न सांगताही मग विद्यार्थी त्यांच्यामागे चालू लागतात आणि आयुष्याला आकार येतो. असे हजारो विद्यार्थी घडविणारे गरवारे महाविद्यालयाचे निवृत्त प्रभारी प्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी हे एक चालतेबोलते होस्टेलपीठ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन तपांपेक्षा जास्त काळ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे होस्टेल आणि आर. व्ही. सर हे एक अतूट नाते आहे. त्यातले केवळ तीन वर्षे मी या वसतिगृहात राहिलो. मी माझ्या आयुष्याकडे बघतो त्या वेळी केत्तूर (ता. करमाळा) सारख्या आडगावातून आलेल्या माझ्यासारख्याला या होस्टेलने जे दिले ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. असे बरेच आहेत ज्यांना आर. व्ही. सरांनी घडवले. वॉर्डन मोहन यादव रशियात, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे अमेरिकेत आहेत. निखिल गाडगीळच्या लंडनला सारख्या वाऱ्या सुरू असतात. विद्येश गोवंडे संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. अभिजित पिंपळे सी.ए. झाला. लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, संजय जोशी, सुपर्णा अष्टेकर, हरीश सारडा हेही आपापल्या फील्डमध्ये आघाडीवर आहेत. जॉन व्हिक्टर, चकोर बाविस्कर, हरीश मेहता, दत्ता कदम, जितेंद्र राक्षे, सूरज शहा, दीपक लोहार, रवींद्र भारदे अशी मागेपुढे असणाऱ्यांची ही यादी लांबवायची म्हटले तर खूप मोठी होईल. आयुष्याच्या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात होस्टेलचे कुटुंबप्रमुख म्हणून आर. व्ही. सरांनी भरलेली ऊर्जा त्याला कारणीभूत आहे. ती आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ते ठरवून काही करत नव्हते. होस्टेलच्या व्यवस्थेचा भाग म्हणून सगळ्यांना ते वाटत गेले. नवे उपक्रम राबवीत गेले. त्याने हजारो जण आपोआप घडत गेले.
विद्यार्थ्यांच्या लेखनाला स्थान देणारा पालवीसारखा वार्षिकांक काढणारे गरवारे कॉलेजचे होस्टेल हे एकमेव असावे. विद्यार्थी असताना दीपा बेंदूर, शैलेश दाभोळ, प्रांजली दाऊदखाने यांना 1994 मध्ये सुभाष घई यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाची व्यासपीठावर थेट मुलाखत घेता येते. या गोष्टी स्वप्नवत वाटत असल्या तरी त्या सत्यात आर. व्ही. सर उतरवीत होते. संधी मिळतेय म्हटल्यावर भावनेच्या भरात अनेक जण वक्तृत्व स्पर्धेत, काव्यवाचनात, व्यासपीठावर काहीबाही बोलल्यावरही ज्या-त्या गोष्टी जिथे-तिथे विद्यार्थ्यांना सांगून अनेकांना त्यांनी लाइनवर आणले. मुला-मुलींचे होस्टेल एकमेकांना लागून आहे, पण त्या सगळ्या वातावरणात आर. व्हीं.चा धाक भरून राहिलेला असायचा. मुला-मुलींचे परस्परसंबंध कसे निकोप ठेवता येऊ शकतात, याचे हे होस्टेल एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मुलांनी सगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व फुलवत असताना त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही, यावरही त्यांचे लक्ष असायचे. कुणाचा कुठे उपयोग करून घ्यायचा याबाबतही त्यांचा दांडगा हातखंडा आहे.
केवळ होस्टेलचे रेक्टर म्हणून नव्हे, तर इतर अनेक संस्थांतही आर. व्ही. कुलकर्णी सर कार्यरत होते, आहेत. एन. सी. सी., रेड क्रॉस, विज्ञान भारती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा विविध ठिकाणी ते काम करीत असल्यामुळे अनेक संधींची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे मिळायची. एनसीसीमध्ये आर. डी. परेड (प्रजासत्ताक दिन संचलन) साठी पूर्वी सहा किलोमीटर धावावे लागत होते. दादा मराठे, मोहन यादव याच्यासह अनेकांची त्यांनी तयारी करून घेतल्याने ते राजपथावर संचलन करू शकले. रेड क्रॉसला मदत मिळावी म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लावलेल्या स्टॉलमध्ये सामाजिक कामातही धमाल अनुभवता यायची. ते कुठलेही काम स्वतः करतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत सांगतात. स्वतः त्यांनी 48 वेळा रक्तदान केले आहे. सतत तीन वर्षे सर्वाधिक रक्तसंकलन केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला. सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांकडून गौरव करण्यात आला. त्यांना अनेक सन्मान मिळाले. आपल्या मोठेपणाबाबत ते नेहमी मौन बाळगतात. आपल्या मोठेपणापेक्षा आपले काम महत्त्वाचे, ही त्यांची धारणा घडोघडी दिसते. त्यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज आहे. सगळा समाज मौज-मस्तीच्या मागे धावत आहे. नैतिकतेचा अभाव ही समाजाची जणू ओळख होऊ पाहत आहे. अशा कालखंडात आर. व्ही. सरांसारखे जीवनशिक्षण देणारे शिक्षक गरजेचे आहेत.
विद्यार्थी घडविणारे
होस्टेलपीठ
|
राजाराम ल. कानतोडे
-----------------------------
प्रेमाने जवळ न घेता अथवा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांत कटू भावना निर्माण होईल, असे न वागता अनेक शिक्षक आपल्या वागण्यातून विद्यार्थ्यांत स्फूर्ती जागवत असतात. न सांगताही मग विद्यार्थी त्यांच्यामागे चालू लागतात आणि आयुष्याला आकार येतो. असे हजारो विद्यार्थी घडविणारे गरवारे महाविद्यालयाचे निवृत्त प्रभारी प्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी हे एक चालतेबोलते होस्टेलपीठ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन तपांपेक्षा जास्त काळ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे होस्टेल आणि आर. व्ही. सर हे एक अतूट नाते आहे. त्यातले केवळ तीन वर्षे मी या वसतिगृहात राहिलो. मी माझ्या आयुष्याकडे बघतो त्या वेळी केत्तूर (ता. करमाळा) सारख्या आडगावातून आलेल्या माझ्यासारख्याला या होस्टेलने जे दिले ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. असे बरेच आहेत ज्यांना आर. व्ही. सरांनी घडवले. वॉर्डन मोहन यादव रशियात, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे अमेरिकेत आहेत. निखिल गाडगीळच्या लंडनला सारख्या वाऱ्या सुरू असतात. विद्येश गोवंडे संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. अभिजित पिंपळे सी.ए. झाला. लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, संजय जोशी, सुपर्णा अष्टेकर, हरीश सारडा हेही आपापल्या फील्डमध्ये आघाडीवर आहेत. जॉन व्हिक्टर, चकोर बाविस्कर, हरीश मेहता, दत्ता कदम, जितेंद्र राक्षे, सूरज शहा, दीपक लोहार, रवींद्र भारदे अशी मागेपुढे असणाऱ्यांची ही यादी लांबवायची म्हटले तर खूप मोठी होईल. आयुष्याच्या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात होस्टेलचे कुटुंबप्रमुख म्हणून आर. व्ही. सरांनी भरलेली ऊर्जा त्याला कारणीभूत आहे. ती आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ते ठरवून काही करत नव्हते. होस्टेलच्या व्यवस्थेचा भाग म्हणून सगळ्यांना ते वाटत गेले. नवे उपक्रम राबवीत गेले. त्याने हजारो जण आपोआप घडत गेले.
विद्यार्थ्यांच्या लेखनाला स्थान देणारा पालवीसारखा वार्षिकांक काढणारे गरवारे कॉलेजचे होस्टेल हे एकमेव असावे. विद्यार्थी असताना दीपा बेंदूर, शैलेश दाभोळ, प्रांजली दाऊदखाने यांना 1994 मध्ये सुभाष घई यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाची व्यासपीठावर थेट मुलाखत घेता येते. या गोष्टी स्वप्नवत वाटत असल्या तरी त्या सत्यात आर. व्ही. सर उतरवीत होते. संधी मिळतेय म्हटल्यावर भावनेच्या भरात अनेक जण वक्तृत्व स्पर्धेत, काव्यवाचनात, व्यासपीठावर काहीबाही बोलल्यावरही ज्या-त्या गोष्टी जिथे-तिथे विद्यार्थ्यांना सांगून अनेकांना त्यांनी लाइनवर आणले. मुला-मुलींचे होस्टेल एकमेकांना लागून आहे, पण त्या सगळ्या वातावरणात आर. व्हीं.चा धाक भरून राहिलेला असायचा. मुला-मुलींचे परस्परसंबंध कसे निकोप ठेवता येऊ शकतात, याचे हे होस्टेल एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मुलांनी सगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व फुलवत असताना त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही, यावरही त्यांचे लक्ष असायचे. कुणाचा कुठे उपयोग करून घ्यायचा याबाबतही त्यांचा दांडगा हातखंडा आहे.
केवळ होस्टेलचे रेक्टर म्हणून नव्हे, तर इतर अनेक संस्थांतही आर. व्ही. कुलकर्णी सर कार्यरत होते, आहेत. एन. सी. सी., रेड क्रॉस, विज्ञान भारती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा विविध ठिकाणी ते काम करीत असल्यामुळे अनेक संधींची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे मिळायची. एनसीसीमध्ये आर. डी. परेड (प्रजासत्ताक दिन संचलन) साठी पूर्वी सहा किलोमीटर धावावे लागत होते. दादा मराठे, मोहन यादव याच्यासह अनेकांची त्यांनी तयारी करून घेतल्याने ते राजपथावर संचलन करू शकले. रेड क्रॉसला मदत मिळावी म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लावलेल्या स्टॉलमध्ये सामाजिक कामातही धमाल अनुभवता यायची. ते कुठलेही काम स्वतः करतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत सांगतात. स्वतः त्यांनी 48 वेळा रक्तदान केले आहे. सतत तीन वर्षे सर्वाधिक रक्तसंकलन केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला. सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांकडून गौरव करण्यात आला. त्यांना अनेक सन्मान मिळाले. आपल्या मोठेपणाबाबत ते नेहमी मौन बाळगतात. आपल्या मोठेपणापेक्षा आपले काम महत्त्वाचे, ही त्यांची धारणा घडोघडी दिसते. त्यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज आहे. सगळा समाज मौज-मस्तीच्या मागे धावत आहे. नैतिकतेचा अभाव ही समाजाची जणू ओळख होऊ पाहत आहे. अशा कालखंडात आर. व्ही. सरांसारखे जीवनशिक्षण देणारे शिक्षक गरजेचे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा