छळ पुरुषांचाही.....
जागतिक महिलादिन धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषांचाही छळ होतो. त्याविषयी आपण काहीच बोलणार नाही का? आज साजरा होत असलेल्या पुरूषदिनानिमित्त एका संस्थेच्या माध्यमातून या प्रश्नाचा घेतलेला वेध...
------------------------------------------
महिलांचा छळ हा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेतला सनातन प्रश्न आहे. महिलांनी आणि समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. देशात 19 व्या शतकात ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या महिलांची स्थिती बदलली पाहिजे, या निष्कर्षाप्रत येऊन ठेपतात. "युनो'ने 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष म्हणून साजरे केले. याबाबत प्रत्येक टप्प्यावर मंथन घडले आहे. काळानुरूप महिलांचे प्रश्न बदलत गेले. पण आता समाजाच्या पोटात पुरुषांच्या छळाची खदखदही सुरू आहे. हा कल्पनाविलास नाही. एका संस्थेची कागदपत्रे चाळल्यानंतर दिसलेली ही स्थिती आहे. "माझा काहीच दोष नाही. हे माझ्यासमोर नेमके काय वाढून ठेवले आहे. माझी यातून सुटका कशी होईल,' अशी आर्त हाक अनेक जण देत आहेत.
- - - - - - - -
"कौटुंबिक सल्ला - सेवा व मार्गदर्शन केंद्र' ही ती संस्था होय. तिच्या महाराष्ट्रात 66 तर देशात सहाशेपेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. दिल्लीच्या समाजकल्याण मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही केंद्र राज्यात चालविली जातात. सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी हे केंद्र चालवीत आहे. जनजागृती आणि अन्य माध्यमातून लोकांना कौटुंबिक आधार देणाऱ्या केंद्राबाबत माहिती दिली जाते. पहिल्यांदा केंद्रात येणाऱ्या महिलेचे किंवा पुरुषाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. बोलते करून त्यांना घुसमटीतून मोकळे केले जाते. त्यानंतर माहिती लिहून घेतली जाते. संबंधितांना बोलविले जाते. त्यांना समजावून या प्रश्नावर तोडग्याचे विविध पर्याय चोखळले जातात. प्रश्न सुटल्यानंतर पुढे सहा महिने फॉलोअप ठेवला जातो. प्रश्न मार्गी लागला तर फाईल बंद होते. काहींच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाकडे वर्ग केली जाते. एखाद्याबाबत पुन्हा जुनाच प्रश्न उद्भवला, तर ती "रिओपन' होते....
----------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्राकडे गेल्या वर्षभरात 154 तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 41 अर्ज सासरी होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाबाबत आहेत. त्यानंतर 35 अर्ज पुरुषांचे आहेत. मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळाल्यानंतर तो मागणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. त्या प्रकारचे 17 अर्ज आहेत. वृद्धापकालीन समस्यांबाबत 14 अर्ज आले आहेत. याशिवाय लैंगिक छळ, विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, लग्नाआधीचे समुपदेशन अशा विविध प्रकारचे अर्ज आले आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य टिकावे म्हणून झटणाऱ्या या संस्थेचा उद्देश महिलांना मानसिकदृष्ट्या मुक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी करणे हा आहे. पण अनेकदा आपल्या नवऱ्याविरुद्ध अथवा सासू-सासऱ्याविरुद्ध अर्ज करणारी महिलाच सगळ्यांना हैराण करीत असल्याचे उघड होते. हे प्रमाणही मोठे आहे. "झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीप्रमाणे अनेक जण इभ्रतीला घाबरून काही बोलत नाहीत, असे कागदपत्र सांगतात.
- - - - - - - -
ती नोकरी करणारी मुंबईतील. बी.कॉम झालेली. तो बी.एस्सी. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील. दोघांचे लग्न झाले. तिला खेडेगावात करमेना. लग्नानंतरही तिने तिच्या मुंबईतील मित्राशी नवऱ्याला न कळता संपर्क ठेवलेला. तो तिला "नवऱ्याला घटस्फोट दे' म्हणून फूस लावायचा. ती दोनदा पळून गेली. तिच्या सांगण्यावरून नवरा तिला घेऊन शहरात राहायचे म्हणून सोलापुरात आला. ती एक दिवस केंद्रात आली. नवरा छळ करतो. मला घटस्फोट हवा, अशी तक्रार तिने केली. तिला एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितले, की मुलाविषयी आमची काही तक्रार नाही. तिने त्याच्यावर पोलिस केस केली. तो व्यवसाय करायचा ती कागदपत्रे जाळली. अखेर तिला तिच्या आईवडिलांकडे सोडण्यात आले. ती गेली. त्याने तिच्यासाठी कितीतरी सोसले. पण तरीही आता तो आणि त्याचे अकरा महिन्यांचे बाळ दिशाहीन झाले आहे.... अशी अनेक प्रकरणे सांगता येतील. महिलांच्या हट्टीपणाची, दुराग्रहाची आणि अहंकाराची...
---------------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्रात अगदी सुरवातीपासून सुमित्रा आगरखेडकर समुपदेशक म्हणून काम करतात. समाजजीवनातील बदलत्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, ""आतापर्यंत आम्ही अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. महिन्याला साधारण पंधरा-वीस जण आमच्याकडे मदतीसाठी येतात. पण मदतीच्या मागणीसाठी येणारी महिला अथवा मुलगीच दोषी आहे, असे ज्या वेळी आढळून येते त्या वेळी वाईट वाटते. अलीकडच्या काळात असे खूपदा आढळून येते. शिकलेल्या मुलींची महत्त्वाकांक्षा मोठी असते. मात्र त्यासाठी आपण आपल्याच माणसाला त्रास देतोय, हे अनेकदा त्यांच्या लक्षातही येत नाही. फार टोकाचे निर्णय घ्यायला त्या तयार होतात. त्यामुळे सध्या अनेक प्रकरणांमध्ये प्रश्नांची गुंतागुंत वाढत गेल्याचे जाणवते.
""सध्याचे कायदे समाजोपयोगी आहेत. मात्र त्याचा अनेकदा गैरवापर केल्याचे दिसून येते. असेच घडत राहिले, तर पुरुष अत्याचार निवारण केंद्राचीही उभारणी करावी लागेल. संस्कृतीची महती आपण नेहमी सांगत असतो पण बदलत्या जमान्यात आपण नेमके कुठे आहोत, याचाही विचार करावा लागणार आहे. कायद्याची माहिती न घेताच अनेकजणी भावाच्या संपत्तीत हक्क हवा म्हणून आमच्याकडे येतात. त्यातून कोर्टाचे खेटे सुरू होतात. पण आतापर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला आहे.''
पत्ता- कौटुंबिक सल्ला- सेवा व मार्गदर्शन केंद्र. 701, थोबडेवाडा. उत्तर कसबा. मल्लिकार्जुन मंदिराशेजारी. सोलापूर.
दूरध्वनी- 0217 2726311.
(हा माझा लेख 27 मार्च 2006 ला सकाळच्या मधुरा पुरवणीत प्रसिद्ध झाला होता ः राजाराम ल. कानतोडे)
जागतिक महिलादिन धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषांचाही छळ होतो. त्याविषयी आपण काहीच बोलणार नाही का? आज साजरा होत असलेल्या पुरूषदिनानिमित्त एका संस्थेच्या माध्यमातून या प्रश्नाचा घेतलेला वेध...
------------------------------------------
महिलांचा छळ हा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेतला सनातन प्रश्न आहे. महिलांनी आणि समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. देशात 19 व्या शतकात ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या महिलांची स्थिती बदलली पाहिजे, या निष्कर्षाप्रत येऊन ठेपतात. "युनो'ने 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष म्हणून साजरे केले. याबाबत प्रत्येक टप्प्यावर मंथन घडले आहे. काळानुरूप महिलांचे प्रश्न बदलत गेले. पण आता समाजाच्या पोटात पुरुषांच्या छळाची खदखदही सुरू आहे. हा कल्पनाविलास नाही. एका संस्थेची कागदपत्रे चाळल्यानंतर दिसलेली ही स्थिती आहे. "माझा काहीच दोष नाही. हे माझ्यासमोर नेमके काय वाढून ठेवले आहे. माझी यातून सुटका कशी होईल,' अशी आर्त हाक अनेक जण देत आहेत.
- - - - - - - -
"कौटुंबिक सल्ला - सेवा व मार्गदर्शन केंद्र' ही ती संस्था होय. तिच्या महाराष्ट्रात 66 तर देशात सहाशेपेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. दिल्लीच्या समाजकल्याण मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही केंद्र राज्यात चालविली जातात. सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी हे केंद्र चालवीत आहे. जनजागृती आणि अन्य माध्यमातून लोकांना कौटुंबिक आधार देणाऱ्या केंद्राबाबत माहिती दिली जाते. पहिल्यांदा केंद्रात येणाऱ्या महिलेचे किंवा पुरुषाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. बोलते करून त्यांना घुसमटीतून मोकळे केले जाते. त्यानंतर माहिती लिहून घेतली जाते. संबंधितांना बोलविले जाते. त्यांना समजावून या प्रश्नावर तोडग्याचे विविध पर्याय चोखळले जातात. प्रश्न सुटल्यानंतर पुढे सहा महिने फॉलोअप ठेवला जातो. प्रश्न मार्गी लागला तर फाईल बंद होते. काहींच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाकडे वर्ग केली जाते. एखाद्याबाबत पुन्हा जुनाच प्रश्न उद्भवला, तर ती "रिओपन' होते....
----------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्राकडे गेल्या वर्षभरात 154 तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 41 अर्ज सासरी होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाबाबत आहेत. त्यानंतर 35 अर्ज पुरुषांचे आहेत. मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळाल्यानंतर तो मागणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. त्या प्रकारचे 17 अर्ज आहेत. वृद्धापकालीन समस्यांबाबत 14 अर्ज आले आहेत. याशिवाय लैंगिक छळ, विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, लग्नाआधीचे समुपदेशन अशा विविध प्रकारचे अर्ज आले आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य टिकावे म्हणून झटणाऱ्या या संस्थेचा उद्देश महिलांना मानसिकदृष्ट्या मुक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी करणे हा आहे. पण अनेकदा आपल्या नवऱ्याविरुद्ध अथवा सासू-सासऱ्याविरुद्ध अर्ज करणारी महिलाच सगळ्यांना हैराण करीत असल्याचे उघड होते. हे प्रमाणही मोठे आहे. "झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीप्रमाणे अनेक जण इभ्रतीला घाबरून काही बोलत नाहीत, असे कागदपत्र सांगतात.
- - - - - - - -
ती नोकरी करणारी मुंबईतील. बी.कॉम झालेली. तो बी.एस्सी. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील. दोघांचे लग्न झाले. तिला खेडेगावात करमेना. लग्नानंतरही तिने तिच्या मुंबईतील मित्राशी नवऱ्याला न कळता संपर्क ठेवलेला. तो तिला "नवऱ्याला घटस्फोट दे' म्हणून फूस लावायचा. ती दोनदा पळून गेली. तिच्या सांगण्यावरून नवरा तिला घेऊन शहरात राहायचे म्हणून सोलापुरात आला. ती एक दिवस केंद्रात आली. नवरा छळ करतो. मला घटस्फोट हवा, अशी तक्रार तिने केली. तिला एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितले, की मुलाविषयी आमची काही तक्रार नाही. तिने त्याच्यावर पोलिस केस केली. तो व्यवसाय करायचा ती कागदपत्रे जाळली. अखेर तिला तिच्या आईवडिलांकडे सोडण्यात आले. ती गेली. त्याने तिच्यासाठी कितीतरी सोसले. पण तरीही आता तो आणि त्याचे अकरा महिन्यांचे बाळ दिशाहीन झाले आहे.... अशी अनेक प्रकरणे सांगता येतील. महिलांच्या हट्टीपणाची, दुराग्रहाची आणि अहंकाराची...
---------------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्रात अगदी सुरवातीपासून सुमित्रा आगरखेडकर समुपदेशक म्हणून काम करतात. समाजजीवनातील बदलत्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, ""आतापर्यंत आम्ही अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. महिन्याला साधारण पंधरा-वीस जण आमच्याकडे मदतीसाठी येतात. पण मदतीच्या मागणीसाठी येणारी महिला अथवा मुलगीच दोषी आहे, असे ज्या वेळी आढळून येते त्या वेळी वाईट वाटते. अलीकडच्या काळात असे खूपदा आढळून येते. शिकलेल्या मुलींची महत्त्वाकांक्षा मोठी असते. मात्र त्यासाठी आपण आपल्याच माणसाला त्रास देतोय, हे अनेकदा त्यांच्या लक्षातही येत नाही. फार टोकाचे निर्णय घ्यायला त्या तयार होतात. त्यामुळे सध्या अनेक प्रकरणांमध्ये प्रश्नांची गुंतागुंत वाढत गेल्याचे जाणवते.
""सध्याचे कायदे समाजोपयोगी आहेत. मात्र त्याचा अनेकदा गैरवापर केल्याचे दिसून येते. असेच घडत राहिले, तर पुरुष अत्याचार निवारण केंद्राचीही उभारणी करावी लागेल. संस्कृतीची महती आपण नेहमी सांगत असतो पण बदलत्या जमान्यात आपण नेमके कुठे आहोत, याचाही विचार करावा लागणार आहे. कायद्याची माहिती न घेताच अनेकजणी भावाच्या संपत्तीत हक्क हवा म्हणून आमच्याकडे येतात. त्यातून कोर्टाचे खेटे सुरू होतात. पण आतापर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला आहे.''
पत्ता- कौटुंबिक सल्ला- सेवा व मार्गदर्शन केंद्र. 701, थोबडेवाडा. उत्तर कसबा. मल्लिकार्जुन मंदिराशेजारी. सोलापूर.
दूरध्वनी- 0217 2726311.
(हा माझा लेख 27 मार्च 2006 ला सकाळच्या मधुरा पुरवणीत प्रसिद्ध झाला होता ः राजाराम ल. कानतोडे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा