एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात
अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे
निघावे, तशी ही कॉलेजची वर्ष असता. या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात.
----------
मैतर जिवाचे लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आवटे माझा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्राकारितेत जी धडक मारली ती कुणीही कौतुक करावं अशीच आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, अलिबाग आता मुंबई, असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नव्हती. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटुता न येऊ देता समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे.
दुसरी प्रतिक्रिया अगदी अलीकडे मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहिला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबर कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले.
तसे हे राजाराम कॉलेजचे दिवस फार भारी होते. किती गोष्टी सांगाव्यात याला पारावार राहणार नाही. माझे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर. मी इतक्या लांब आणि तेही आर्ट शिकायला कसे गेलो, असे अजूनही मला अनेकजण विचारतात. तसे कारण काहीच नव्हते पण चांगले मार्क पडले होते, पैलवानांचे गाव म्हणून कोल्हापूरचे आकर्षण होतेच. तसे हे गाव दिलदार आहेच. त्यात राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, ऍग्रिकल्चर कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि शाहू इन्टिट्युट म्हणजे सायबर हा सगळा हजार-दीड हजार एकराचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलेला असतो. या परिसरात रहायला मिळणे हा तसा एक मोठा संधीचा भाग असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर या भागात इतके मस्त वातावरण असते की ते सांगायला कवीची प्रतिभा पाहिजे. कोणत्याही आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा, असे वाटतेच. पण त्यापलीकडे माझ्या दोन नंबरच्या भावाला म्हणजे कारभाऱ्याला गावात शंकाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि घरात सगळेजण बापू म्हणतात त्याला मी पैलवानकीत नाव कमवावे, असे वाटायचे. त्याचे काय झाले पुढे सांगेन. पण माझा दुसरा भाऊ तुकाराम बुवालाही माझ्या शिक्षणाचे कौतुक होते. तोच पहिल्यांदा माझ्याबरोबर ऍडमिशन घ्यायला आला. सोडवायला कारभारी आला. पुढचा शिक्षणाचा सगळा प्रवास माझा मी एकट्याने केला.
जाता जाता दोघांची नोंद करायला पाहिजे. तिथे कुणी गावाकडचे किंवा गावाजवळचे भेटले की चांगले वाटायचे. एकदा भाऊ कानतोडे माझ्याकडे आला होता. आम्ही दोघ त्यावेळीही कोल्हापूर खूप फिरलो. भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर एकदा पोमलवाडीचा हनुमंत पाटीलही भेटला होता. तो राजाराम कॉलेजचाच विद्यार्थी होता. राजकुमार लोटके त्याचा जवळचा मित्र होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या होत्या. भाऊ आणि हनुमंत हे दोघेही तसे खूप चांगले होते, पण काळाने दोघांवरही अकाली झडप घातली. दोघांचेही वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाले. जेव्हा जेव्हा या दोघांचा कुठे बोलताना विषय येतो त्यावेळी मला मी अनुभवलेला त्यांच्यातला उमेदपणा दिलदारपणा विसरता येत नाही. पण सगळ्या गोष्टींवर काळ हेच औषध असते. एखाद्या एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे निघावे, तशी ही कॉलेजची दोन वर्ष होती. सांगण्यासारखे आणखी खूप आहे पण या लेखाच्या निमित्ताने एवढेच पुरेसे आहे... या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात. तसा प्रत्येकाचा हा वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षाचा काळ जडणघडणीचा असतो. तुम्हाला तुमचे दिवस आठवले. मैत्रभाव जागा झाला तर या लेखाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.....
----------------------
----------
मैतर जिवाचे लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आवटे माझा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्राकारितेत जी धडक मारली ती कुणीही कौतुक करावं अशीच आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, अलिबाग आता मुंबई, असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नव्हती. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटुता न येऊ देता समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे.
दुसरी प्रतिक्रिया अगदी अलीकडे मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहिला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबर कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले.
तसे हे राजाराम कॉलेजचे दिवस फार भारी होते. किती गोष्टी सांगाव्यात याला पारावार राहणार नाही. माझे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर. मी इतक्या लांब आणि तेही आर्ट शिकायला कसे गेलो, असे अजूनही मला अनेकजण विचारतात. तसे कारण काहीच नव्हते पण चांगले मार्क पडले होते, पैलवानांचे गाव म्हणून कोल्हापूरचे आकर्षण होतेच. तसे हे गाव दिलदार आहेच. त्यात राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, ऍग्रिकल्चर कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि शाहू इन्टिट्युट म्हणजे सायबर हा सगळा हजार-दीड हजार एकराचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलेला असतो. या परिसरात रहायला मिळणे हा तसा एक मोठा संधीचा भाग असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर या भागात इतके मस्त वातावरण असते की ते सांगायला कवीची प्रतिभा पाहिजे. कोणत्याही आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा, असे वाटतेच. पण त्यापलीकडे माझ्या दोन नंबरच्या भावाला म्हणजे कारभाऱ्याला गावात शंकाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि घरात सगळेजण बापू म्हणतात त्याला मी पैलवानकीत नाव कमवावे, असे वाटायचे. त्याचे काय झाले पुढे सांगेन. पण माझा दुसरा भाऊ तुकाराम बुवालाही माझ्या शिक्षणाचे कौतुक होते. तोच पहिल्यांदा माझ्याबरोबर ऍडमिशन घ्यायला आला. सोडवायला कारभारी आला. पुढचा शिक्षणाचा सगळा प्रवास माझा मी एकट्याने केला.
जाता जाता दोघांची नोंद करायला पाहिजे. तिथे कुणी गावाकडचे किंवा गावाजवळचे भेटले की चांगले वाटायचे. एकदा भाऊ कानतोडे माझ्याकडे आला होता. आम्ही दोघ त्यावेळीही कोल्हापूर खूप फिरलो. भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर एकदा पोमलवाडीचा हनुमंत पाटीलही भेटला होता. तो राजाराम कॉलेजचाच विद्यार्थी होता. राजकुमार लोटके त्याचा जवळचा मित्र होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या होत्या. भाऊ आणि हनुमंत हे दोघेही तसे खूप चांगले होते, पण काळाने दोघांवरही अकाली झडप घातली. दोघांचेही वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाले. जेव्हा जेव्हा या दोघांचा कुठे बोलताना विषय येतो त्यावेळी मला मी अनुभवलेला त्यांच्यातला उमेदपणा दिलदारपणा विसरता येत नाही. पण सगळ्या गोष्टींवर काळ हेच औषध असते. एखाद्या एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे निघावे, तशी ही कॉलेजची दोन वर्ष होती. सांगण्यासारखे आणखी खूप आहे पण या लेखाच्या निमित्ताने एवढेच पुरेसे आहे... या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात. तसा प्रत्येकाचा हा वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षाचा काळ जडणघडणीचा असतो. तुम्हाला तुमचे दिवस आठवले. मैत्रभाव जागा झाला तर या लेखाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.....
----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा